मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांची मागणी
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारातील गुन्हेगार सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल कडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली होती. मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर रोजी केला होता. श्री देवेंद्र फडवणीस यांनी आणखी चार मालमत्तेचे प्रकरणे ईडी कडे चौकशीसाठी दिले होते याबाबत श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे पुरावे ईडी कडे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे देखील दिले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून अल्पशा दराने मंत्री नवाब मलिक यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या या जमिनीची किंमत करोडो रुपयांनी होती. बॉम्बस्फोट आरोपी व दाऊदशी घनिष्ट संबंध असल्याचे देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी आज सकाळपासून मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले होते. चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बरखास्त करावे अशी देखील मागणी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे. राज्याच्या एकापाठोपाठ एक एक मंत्री तुरुंगात जात आहे. नवाब मलिक यांनी देशद्रोहयांकडून जमिनी खरेदी करावे तेही अल्पशा दराने खरेदी करावे याचा अर्थ काय समजावा ? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी उपस्थित केला. बॉम्बस्फोटातील आरोपींनी नवाब मलिक यांना कवडीमोल किमतीत जमिनी कुठल्या आधारावर दिल्या की नवाब मलिकांनी देशद्रोह्यांना बॉम्बस्फोटातील आरोपींना कोणते असे सहकार्य केले की, ज्यामुळे या आरोपींनी मंत्री नवाब मलिक यांना कवडीमोल किमतीत जमिनी दिल्या याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment